- वनविभागाने केले धनादेश वाटप
भवानीनगर – काटेवाडी, कण्हेरी, ढेकळवाडी भागामध्ये बिबट्याने काही ठिकाणी हल्ले करून या हल्ल्यांमध्ये शेळी, बोकड आणि काही ठिकाणी गाईचे वासरू पाळीव प्राणी मारले गेले होते. याबाबत वन विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला होता. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वनविभागाच्या वतीने मंगळवारी (दि. 4) धनादेश वाटप करण्यात आले.
वन परिमंडळ अधिकारी त्रिंबक जराड, वनरक्षक मीनाक्षी गुरव, संध्या कांबळे, अनिल माने, वनसेवक दत्तात्रय पाटोळे, कण्हेरीचे सरपंच सतीश काटे, श्री छत्रपती साखर कारखान्याचे माजी संचालक तात्यासाहेब देवकाते, पोलीस पाटील शंकर काळे, ग्रामसेवक पूनम गायकवाड, ऋषिकेश कोकाटे, संदीप मासाळ आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी तानाजी साहेबराव देवकाते यांना चार हजार रुपये, रवींद्र मारुती देवकाते यांना चार हजार रुपये, भीमराव तुळशीराम खरात यांना आठ हजार रुपये, सतीश दिलीप काळे यांना चार हजार रुपये त्याचप्रमाणे जैनकवाडी येथील किशोर सुरेश पवार यांना आठ हजार रुपये, अरविंद गणपत पवार यांना आठ हजार रुपये या सर्व शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
अजूनही बारामती तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यातील शेळी, बोकड किंवा एखादे वासरू बिबट्याने खलास केलेले आहे. त्यांनाही वन विभागाच्या मार्फत नुकसान भरपाई मिळणार आहे.
-त्र्यंबक जराड, वन परिमंडळ अधिकारी बारामती.