नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. आरएसएस आणि भाजपचा पराभव करायचा असेल तर मुस्लिमांनी वंचित बहुजन आघाडीच्या माघे उभे राहिले पाहिजे, असे आवाहन प्रकाश आंबेकर यांनी उपस्थितांना केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांच्या प्रचारार्थ नाशिक येथे बोलत होते.
दरम्यान, त्यांनी नरेंद्र मोदी प्रियांका गांधींना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला. प्रियांका गांधींनी नुसतीच हवा केली त्या मोदी विरोधात उभ्या राहिल्या असत्या तर त्यांच्या प्रचाराला गोलो असतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.