मुंबई – दुचाकीसाठी महाराष्ट्राची बाजारपेठ उत्तम आहे. रॉयल इन्फिल्ड या कंपनीच्या दुचाकीनाही महाराष्ट्रातून उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे, असे रॉयल इन्फिल्ड या कंपनीचे विपणन प्रमुख शुभ्रांशू सिंह यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, रॉयल इन्फिल्ड भारतासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन आणि विकास करून गाड्यांची निर्मिती करीत आहे. त्यामुळे परदेशातील मोठ्या कंपन्यांच्या मोटरसायकलपेक्षाही रॉयल इन्फिल्डला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.त्याचबरोबर आता कंपनीच्या मोटरसायकल सर्व खंडातील देशात मोठ्या प्रमाणात निर्यात केल्या जात आहेत. त्यामुळे भारताला यातून बरेच परकीय चलन मिळू लागलेले आहे. रॉयल इन्फिल्ड मेक इन इंडियाची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी केलेली आहे.
कंपनीने केलेले संशोधन आणि विकास आणि डिझाइन केवळ भारतातच नाही तर जगभरात स्वीकारले जात आहे. महाराष्ट्राबरोबरच कंपनीच्या वाहनांना केरळ, कर्नाटक या राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून कंपनीच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असून भारतात आता बुलेट इन्फिल्ड वाहनांची संख्या तब्बल 35 लाखांवर गेलेली आहे.
कंपनीने नव्यानेच सादर केलेल्या इंटरसेप्टर या वाहनाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. वाहनाला इमोटीद्वारे उत्कृष्ट बाईक हा पुरस्कार देण्यात आला. वाढती मागणी असल्यामुळे काही काळ ग्राहकांना थांबावे लागते. कंपनीचे तामिळनाडूत उत्पादनाचे तीन प्रकल्पापासून ते पूर्णक्षमतेने चालविण्यात येत आहेत. कंपनी विस्तारीकरणासाठी 700 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करतील