नवी दिल्ली – जानेवारी ते मार्च 2019 या तिमाहीत भारतात येणाऱ्या स्मार्टफोनच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ होऊन ती 31 दशलक्ष युनिट एवढी झाली असल्याचे काउंटर पॉईंट रिसर्च या संस्थेने म्हटले आहे.
या संस्थेच्या विश्लेषक अंशिका जैन यांनी सांगितले की, 5 जी स्मार्टफोन काही महिन्यात उपलब्ध होण्याची शक्यता असल्यामुळे 4जी तंत्रज्ञानावरील आधारित स्मार्टफोन खरेदी करण्याचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी स्मार्टफोनची विक्री झाल्याचे दिसून येत आहे. मात्र भारतातील आणि परदेशातील विविध मोबाइल कंपन्या आपली नवी मॉडेल भारतामध्ये आक्रमकपणे सादर करीत आहेत.
कारण इतर देशांच्या तुलनेत भारतात स्मार्टफोनची विक्री तुलनेत जास्त आहे. सॅमसंग जिओ, लावा, नोकिया, आयटेल या कंपन्यांनी आक्रमक प्रचार मोहीम हाती घेतली आहे. भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतील शिवोमीचा वाटा 29%, सॅमसंगचा वाटा 23 टक्के, विवो चा वाटा 12 टक्के, रियल मी आणि ओप्पोचा वाटा 7 टक्के आहे.