खोडद – सध्या अत्यंत कमी पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग जरी संकटात सापडला असला तरी आखाड पार्ट्यांना मात्र ऊत आलेला दिसत आहे.
आखाड महिना चालू होऊन 15 ते 20 दिवस लोटले असून, या महिन्यात सर्वत्र मटणाची दुकाने फुल्ल झाल्याचे दिसत आहे. विलायती कोंबड्यांचा भाव 180 ते 200 रुपये किलो, तर गावठी कोंबडीचा भाव 300 ते 350 रुपये किलो असून बोकडाच्या मटणाचा भाव 500 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सध्या बोकड मिळत नसल्यामुळे या मटणाचा भाव 500 रुपयापर्यंत गेला आहे. बॉयलर कोंबडीचा भाव 200 रुपये असल्यामुळे बरेच लोक विलायती कोंबडीचे मटण घेणे पसंत करीत आहेत. पुढील श्रावण महिन्याचा काळ उपवासाचा असल्याने सध्या आषाढातील पार्ट्या परिसरात रंगू लागल्या आहेत.