पारगाव शिंगवे- जीवनात आनंद व सुख मिळवण्यासाठी परमेश्वरांचे नामस्मरण करावे व तुम्ही जगा व दुसऱ्यालाही जगवा हा संदेश मनात धरून जीवन जगावे, असे मत प्रवचनकार मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केले. आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे सद्गदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने प्रेरित झालेल्या सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मोहन कुलकर्णी बोलत होते. कार्यक्रमात सरपंच रुपाली भोजणे, नवनाथ जारकड, सखाराम बारवकर, पंढरीनाथ कजबे, बाळासाहेब मेंगडे, सुनीता भागवत, गजाबा लबडे, शोभा वाजगे, सेवा केंद्राचे अध्यक्ष भीमा जारकड, नंदा दरेकर, शारदा थोरात, संदीप करंडे, तुषार थोरात, सुनीता भोजने, वर्षा भोजणे, शोभा भोजने, दादाभाऊ वणवे, सविता लबडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गोरडे यांनी केले तर मंगेश बारवकर यांनी आभार मानले.