नवी दिल्ली : – स्टार लेग स्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहल याला आशिया करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही, त्यामुळे त्याची पत्नी धनश्री चांगलीच संतापली आहे. अती समजूतदारपणाही कधी कधी भोवतो, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आपली कारकीर्द घडवायची असेल तर काही वेळा स्वार्थी असणे अत्यंत महत्त्वाचे असते. निवड समितीने कोणत्या निकषावर चहलला वगळले ते अनाकलनीय आहे.
त्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. त्यातही त्याने मर्यादित षटकांच्या सामन्यात किफायतशीर गोलंदाजी केली असूनही त्याला वगळण्यात आल्याने खूप वाईट वाटत आहे, असेही तिने म्हटले आहे.
ज्यांची संघात निवड करण्यात आली आहे त्यांचे निवड समिती तसेच कर्णधार यांच्याशी चांगले संबंध असावेत, असा ताशेराही तिने मारला आहे.