नवी दिल्ली – कृषी कायदे मागे घ्यावेत ही आमची प्रमुख मागणी असून ती मान्य झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाहीं आणि घरी परतणार नाही अशी भूमिका शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकेैत यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलन प्रसंगी गाझीपुर सीमेवर जमलेल्या शेतकऱ्यांच्या समोर बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
या मागणीच्या पुर्ततेसाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंत वेळ देत आहोत. तो पर्यंत ही मागणी मान्य करा अन्यथा या आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढवली जाईल असा इशाराहीं त्यांनी दिला. कोणत्याही दबावाखाली सरकारशी चर्चा करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की आम्ही सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंतचा वेळ दिला आहे. तो पर्यंत आम्ही येथेच बसून राहणार आहोत आता कायदे मान्य झाल्याशिवाय घरवापसी नाहीं हा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
किसान आंदोलकांनी आज संपुर्ण देशभर दुपारी 12 ते 3 यावेळेत चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. उस गाळपाचा हंगाम सुरू असल्याने उत्तरप्रदेश, उत्तराखंड या राज्यांना या आंदोलनातून वगळण्यात आले होते. तथापि देशाच्या अन्य भागात या आंदोलनाला चांगला प्रतिसाद लाभला.