अभिनेत्री भूमी पेडणेकर एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने स्वतःच्या कर्तृत्वाने बॉलीवूडमध्ये स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या अभिनेत्रीने अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले असून युवापिढीच्या मनावर अधिराज्य केले आहे.
आपल्या शानदार, पॉझिटिव्ह, जेंडर-डिफाइनिंग भूमिकांमुळे तिने चित्रपटांमधील महिलांच्या भूमिकांमध्ये मोठा बदल घडवून आणला आहे. विशेष म्हणजे, भूमी पेडणेकरनेच सर्वात प्रथम इंडस्ट्रीमधील स्त्री-पुरुष चित्रीकरण बदलण्याविषयी आवाज उठविला होता.
भूमीच्या मते, चित्रपटांमध्ये महिलांना कमकुवत दाखविण्याचा विचार आता बदलला पाहिजे. कारण महिला या सशक्त आहेत. यासाठी लैंगिक भेदभावावर आधारित आपली विचारसारणी बदलली पाहिजे. महिलांना आणि पुरुषांना पडद्यावर दाखविताना त्यात परिर्वतन झाले पाहिजे. महिलांना कमजोर समजू नये. कारण त्यांच्यातही चांगले गुण, महत्त्वाकांक्षा आहे. तसेच महिलांच्या शारीरिक व भावनात्मक गोष्टी असतात ज्यात त्या संतुलन राखण्यास सक्षम आहेत.
भूमी म्हणते, पुरुष हे ताकदवान असल्याचे सांगत आपण त्यांच्यावर खूप दबाव टाकत आहे. ताकदवानचा अर्थ रडू नये, आपल्या भावना खुलेपणाने मांडू नये असा होत नाही. यामुळे “मर्द को दर्द नहीं होता’ ही विचारधारा बदलण्याची गरज आहे, असे ती सांगते.