Rohit Pawar On Bjp : नागपुरात भाजपतर्फे आयोजित एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. किती निष्पाप नागरिकांच्या सरणावर भाजपा आपली भाकरी भाजणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पवार यांनी ट्विट करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ”महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या इव्हेंटमध्ये खारघरला अनेकांचा मृत्यू होऊनही राजकीय इव्हेंट करण्याची भाजपची हौस काही भागत नाही. म्हणूनच, निवडणूक डोळ्यापुढे ठेवून नागपूरमध्ये भाजपने घेतलेल्या इव्हेंटमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागला.” | Rohit Pawar On Bjp
नेमकं काय घडलं होत कार्यक्रमादरम्यान ?
मनूबाई तुळशीराम राजपूत असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाक घर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण होणार होते. | Rohit Pawar On Bjp
सकाळी १० वाजल्यापासून शिबिराची वेळ होती. मात्र, सकाळी सातपासूनच सुरेश भट सभागृहासमोर हजारो लाभार्थ्यांची गर्दी जमली. सव्वा दहानंतर सभागृहाचे दार उघडले असता, आत जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यामुळे गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरी दरम्यान मनूबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले. त्यात, त्यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाच्या इव्हेंटमध्ये खारघरला अनेकांचा मृत्यू होऊनही #राजकीय_इव्हेंट करण्याची भाजपची हौस काही भागत नाही. म्हणूनच निवडणूक डोळ्यापुढं ठेवून नागपूरमध्ये भाजपने घेतलेल्या इव्हेंटमध्ये #चेंगराचेंगरी होऊन एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागला. अशा अजून किती… pic.twitter.com/3Z6AUR0zLT
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 10, 2024
नुकसान भरपाई देण्याची मागणी
याशिवाय घटनेत काही महिला या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मृत महिलेच्या नातेवाइकांनी शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. | Rohit Pawar On Bjp