कोपरगाव – सहकार महर्षी माजी मंञी शंकरराव गेणुजी कोल्हे यांचे बुधवार दि. १६ मार्च २०२२ पहाटे चारच्या दरम्यान नाशिक येथे उपचारा दरम्यान वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी साडेचार वाजता कोपरगाव येथील संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात होणार आहे त्यांच्या पाश्चात्य पत्नी ,कोल्हे कारखान्याचे चेअरमन बिपीन कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, डॉ. मिलींद कोल्हे हे तिन मुलं तर मुलगी निलीमा पवार आहेत. माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या त्यांच्या सुनबाई असुन . विवेक कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, प्राची पवार,इशांत कोल्हे यांच्यासह अनेक नातवंडे,असा मोठा परिवार आहे. माजी मंञी कोल्हे यांच्या निधनाने देशाच्या सहकारातील एका सुर्याचा अस्त झाला आहे.
माजी मंञी शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यभर सहकार टिकवून तो वाढवण्यासाठी संघर्ष करीत राहीले. देशात संजीवनी अर्थात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अग्र क्रमांकाने चालवून नवा विक्रम प्रस्थापित केला. जुन्या पिढीतील विदेशी उच्चशिक्षित असलेले कोल्हे यांनी जर ठरवले असते तर एखाद्या देशाचे ते प्रमुख झाले असते पण त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा सदउपयोग आपल्या मायभूमीसाठी करुन राज्यासह देशात सहकाराचे जाळे पसरले.सहकार लाढवून तो टिकवण्यात कोल्हे यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक दशके ते कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून काम पहात असताना राज्याच्या मंञी मंडळात विविध खात्याचे मंञी म्हणून यशस्वी कामकाज करीत जनहिताचे धाडशी निर्णय घेतले.रोखठोक बोलुन, शिस्तप्रिय असलेला नेता म्हणून माजी मंञी शंकरराव कोल्हे यांची राज्याला ओळख आहे. पाटपाण्यासाठी कोल्हे यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जनमाणसांच्या कल्याणासाठी व सिंचनाच्या पाण्यासाठी आपला देह झिजवला. शिक्षणाच्या माध्यमातून हजारो युवकांचे आयुष्य कोल्हे यांच्यामुळे उज्वल झाले. अनेक अंधारलेल्या झोपडीत कोल्हे यांच्यामुळे प्रगतीचा प्रकाश पडला. सहकार, राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, अध्यात्मिक व साहित्य क्षेञात माजी मंञी शंकरराव कोल्हे यांचे कार्य एका दिपस्तंभाप्रमाणे आहे. सध्याच्या व राजकारणातील अनेक यशस्वी नेत्यांना शंकरराव कोल्हे यांनी राजकीय धडे देवून त्यांना घडवले. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याच्या मनामध्ये शंकरराव कोल्हे यांच्याप्रति आदर आहे. अशा महान व्यक्तीच्या जन्म कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे २४ मार्च १९३१ रोजी झाला त्यांनी – बी. एस्सी (ऍ़ग्री) पूणे विद्यापीठ १९५०, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे शेती विषयक अभ्यासक्रमाचे ६ महिने प्रशिक्षण. युरोप मध्ये ३ महिने उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण घेतले होते. १९५०साली सर्वप्रथम येसगावचे सरपंच झाले त्यानंतर त्यांनी राजकारणात उतरले आणि राज्याच्या विविध खात्याचे मंञी झाले.
शंकरराव कोल्हे हे १९७२ते ८४- व १९९० ते २००४- पर्यंत विधानसभेत निवडून गेले त्यात (१९७२ला-अपक्ष, १९७८ला -काँग्रेस (आय), १९८०ला -काँग्रेस (आय),१९९०ला -काँग्रेस (आय), १९९५ ला -काँग्रेस (आय),१९९९ ला -राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार व मंञी म्हणून कार्य केले ते सहकार मंञी, परिवहन मंञी महसूल मंत्री अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी पार पाडली. तर १९९९साली ते विधानसभेचे हंगामी सभापती होते. स्व. कोल्हे हे रयत शिक्षण संस्थेचे अनेक वर्षे संचालक होते. स्व. कोल्हे यांच्या निधनाने राजकीय,सामाजीक, शैक्षणिक , अध्यात्मिक, क्षेञातील सर्वांना मोठा धक्का बसला असुन सर्व स्तरातून स्ध. कोल्हे यांच्या प्रति शोक व्यक्त केले जात आहे.