मुंबई – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी यावर माध्यमांशी बोलतांना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,’वेळ दिल्यावर सरसकट आरक्षण देणार का ? असा प्रश्न सरकारला पाटील यांनी विचारला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन शकत नाही असेही ते म्हणाले आहे
मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीतील महत्त्वाचे मुद्दे…
– सर्व पक्षीय नेते आतून एकच मराठ्यांना येड्यात काढत आहे
– मराठ्यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही
-काहीही झालं तरी मागणी पूर्ण झाल्या शिवाय आंदोलन सोडणार नाही
– फडणवीसांनी चर्चेसाठी याव, त्यांना कोणीही अडवणार नाही आम्ही त्यांना संरक्षण देऊ
– सरकारला किती वेळी पाहिजे सांगावा, वेळ दिल्यास आरक्षण सरसकट मिळणार का ?
– आम्ही मनावर घेतलं तर ५ मिनिटात यांचा आवाज बंद करू
आम्ही मनावर घेतलं तर ह्यांचा आवाज ५ मिनिटात बंद करू, सरकारला किती वेळ पाहिजे ते सांगावं. सरकार वातावरण बिघडवू पाहत आहे. काही झालं तरी आमरण उपोषण सोडणार नसल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
– आम्ही लढाईसाठी सज्ज, साकारणं वातावरण खराब करू नये