नवी दिल्ली – बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि राजकोट येथे भव्य दरबार भरवतात. त्यांनी दरबारात केलेले विधान नेहमीच चर्चेत असतात. अशात गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी शिवरंजनी तिवारीची चर्चा सर्वत्र आहे.
दरम्यान, बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्न बघणारी एमबीबीएसची विद्यार्थिनी शिवरंजनी तिवारी शनिवारी बांदा येथून बागेश्वरला निघाली. ती 16 जूनला बागेश्वर धामला पोहोचेल. पण शिवरंजनीला कळाले की,’बाबा १५ जूननंतर एकांतात जाणार आहेत, तेव्हा ती अस्वस्थ दिसली. आपल्या इच्छेचा कलश घेऊन ती बागेश्वरला जात आहे. यासोबतच बाबा धीरेंद्र शास्त्री यांना प्राणनाथ म्हणत आहेत.
यावर ‘वृत्त’ वहिनींनी तिच्याशी संवाद साधला, तेव्हा शिवरंजनी वडील बैजनाथ तिवारी म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री त्यांच्या नात्यात येतात. 16 जून रोजी ते आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन बागेश्वर धामला जाणार आहेत. अशात विशेष म्हणजे पंडित धीरेंद्र शास्त्री हे तिचे प्राणनाथ असल्याचे शिवरंजनी सांगत असताना बाबा बागेश्वर तिला मुलगी म्हणत आहेत.
लग्नाच्या प्रश्नावर शिवरंजनी म्हणाली,’16 जून रोजी महाराज स्वतः माझ्यासोबत भेट घेतील आणि माझ्या मनात काय चालले आहे आणि मी हा प्रवास का केला हे ते स्वतः सांगतील.’ ‘मी लग्न करणार आहे, असे कधीच म्हटलेले नाही. मी त्यांना प्राणनाथ म्हणते. ते माझे प्राणनाथ आहे, ते भविष्यातही असेल. 16 जूनपर्यंत बागेश्वर धाम गाठण्याचा माझा प्रयत्न आहे, पण उष्णता खूप आहे, त्यामुळे एक-दोन दिवस उशीर होऊ शकतो.’