मुंबई : राकेश मारीया यांनी त्यांच्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकात केलेल्या आरोपांबाबत गरज भासल्यास चौकशी करण्यात येईल, मात्र त्यापुर्वी मी त्यांच्याशी चर्चा करेन, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. प्रथमच सरकारच्या वतीने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारीया यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. देशमुख म्हणाले, आम्ही मारीया यांनी त्यांच्या पुस्तकात जे लिहलेय त्या संदर्भात माहिती संकलीत करत आहोत. आम्ही त्यांच्याशी बोलू आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांच्यावर केलेल्या आरोपाची माहिती घेऊ. जर गरज भासली तर चौकशी करू, असे ते म्हणाले.
आपण इंद्राणी मुखर्जी यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप झाला. आपण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की, आपण इंद्राणी मुखर्जीला पाठीशी घातले नाही. या उलट आपल्या पथकाने तीन वर्ष न उलगडलेला गुन्हा उलगडला आहे, असे उल्लेख लेट मी से इट नाऊ या पुस्तकात करण्यात आले आहेत.
शिना बोरा प्रकरण तीन वर्ष उलगडले गेले नव्हते. ते माझ्या पथकाने उलगडले. जर आम्हाला त्यांना पाठीशी घालायचे असते तर आम्ही हे प्रकरण उलगडलेच नसते. मी माझ्या पथकाने हा गुन्हा उलगडल्यावर फक्त 12 दिवसांत मला पदोन्नती देऊन बदली करण्यात आली, असे त्यात लिहले आहे.
या प्रकरणात आम्ही पिटर मुखर्जी यांचा सहभाग, त्यांचे आर्थिक व्यवहार यांची समांतर चौकशी करत होतो. पिटर मुखर्जी याचा सहभाग शोधून अटक करायला 90 दिवसांचा कालावधी सीबीआयला लागला. हे वाईट अनुचित आणि माझ्यावर अन्याय करणारे होते. गाडलेले हे प्रकरण मुंबई पोलिसांनी शोधून काढल.,असे मारीया यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले होते.