इस्लामाबाद – जी-20 देशांची आंतरराष्ट्रीय परिषद भव्य स्वरुपात दिल्लीमध्ये सुरु झाला असताना, शेजारी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानचा फारच जळफळाट झाला आहे. जी-20 सदस्य नसल्याने पाकिस्तानला या परिषदेला बोलावण्याचे कोणतेही कारण नसल्याने भारताचे जागतिक कौतुक पहात बसण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीही उरलेले नाही.
आम्ही अण्वस्त्रधारी देश असूनही भारताने आम्हाला जी-20 परिषदेसाठी आमंत्रित केले नाही याची आम्हाला खूप लाज वाटत असल्याचे एका पाकिस्तानी नागरिकाने एका वाहिनीवर बोलताना सांगितले. ही एक बोलकी प्रातिनिधिक प्रतिक्रिया ठरली आहे. पाकिस्तानी यूट्यूब चॅनल ‘रियल एंटरटेनमेंट’वर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
ज्यामध्ये अँकरने पाकिस्तानी लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेबद्दल चर्चा केली आणि विचारले की भारत इतका पुढे गेला आहे. तिथे जी-20 सारख्या परिषदा होत आहेत आणि जगातील सर्वोच्च नेते भारतात आहेत, मग पाकिस्तान मागे का राहिला? याला उत्तर देताना लोकांनी अतिशय मजेशीर उत्तरे दिली आहेत.
एका व्यक्तीने सांगितले की, ‘पाकिस्तान चुकून स्वतंत्र झाला, त्यावेळी जे फाळणीला विरोध करत होते ते बरोबर होते. आणखी एक नागरिक म्हणाला की, पाकिस्तानी नेत्यांनी जागे होणे गरजेचे आहे. ज्या परिषदेला बांगलादेशला निमंत्रण आहे, तिथे पाकिस्तानचा साधा उल्लेखही कोणी करत नाहीये. भारताचे कौतुक करताना आणखी एक पाकिस्तानी म्हणाला की, भारत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे. भारताच्या काश्मीरमधील लोकांना आमच्यापेक्षा जास्त सुविधा आहेत.
आपल्या देशाच्या राज्यकर्त्यांवर टीका करताना एका व्यक्तीने म्हटले की, पाकिस्तान हा भुकेलेला, नग्न देश आहे आणि अशा देशाशी कोणीही संबंध ठेवत नाही. प्रत्येक देशाला वाटेल की पाकिस्तान पैसे मागायला आला आहे. पाकिस्तानची भारताशी स्पर्धा नाही, ते चंद्रावर गेले आहेत आणि आमचे देशातलेच भांडण संपत नाही.
पाकिस्तान G20 चा सदस्य नाही…
संभाषणादरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकाने सांगितले की, जर इम्रान खान देशाचे पंतप्रधान राहिले असते, तर ही G20 बैठक पाकिस्तानात झाली असती. तथापि, यूट्यूबरने प्रश्न विचारत त्या व्यक्तीला व्यत्यय आणला की पाकिस्तान G20 चा सदस्य नाही, मग G20 परिषद पाकिस्तानमध्ये कशी आयोजित केली जाऊ शकते?
आम्ही तुम्हाला सांगतो की पाकिस्तान G20 चा सदस्य नाही. सदस्य देशांव्यतिरिक्त भारताने इतर 9 देशांनाही विशेष निमंत्रण दिले आहे. यामध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलॅंड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे. भारताचे पाकिस्तानशी संबंध चांगले नाहीत, त्यामुळेच सरकारने पाकिस्तानला निमंत्रण दिले नसल्याची शक्यता आहे.