पुणे – दर पावसाळ्यात भीमा नदी पूर येतो. त्यातून होणारी हानी टाळण्यासाठी देशपातळीवरील तज्ज्ञांच्या सहभागाने विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. नदीच्या उगमापासून ते कर्नाटक राज्याच्या हद्दीपर्यंतची पुराची कारणे, परिणाम, आपत्ती टाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना ही समिती सुचवणार आहे.
पुराच्या अनुषंगाने या समितीने समितीने बारामतीपासून ते सोलापूर-पंढरपूर भागाचा दौरा केला. या दौऱ्यात पूराच्या कारणांबरोबरच नागरीकांशीही समितीच्या सदस्यांनी संवाद साधला.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीचा फटका पंढरपूर शहरासह परिसरातील गावांना बसला होता. यासर्व पार्श्वभूमीवर भीमा खोऱ्याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये बारा सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतीय हवामान विभागातील तज्ञ, आयआयटी मुंबई, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था (सीड्ब्लुपीआरएस), महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर आदींसह सामाजिक संस्थांचा समावेश आहे.