जळोची (बारामती) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दिपोत्सवानिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तिघेही उपस्थित होते. गेल्या काही दिवसापासून भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे यांची जवळील खूप वाढली आहे.
याबाबत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला का वाईट वाटते असा प्रतिप्रश्न प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. दिवाळीच्या काळात सर्वांनी एकत्र यावे, एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात, त्यात लगेच बातमी करायचे काय कारण आहे, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली.
2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागेल; भाजपच्या बड्या नेत्याचा इशारा https://t.co/oCrjFqq3dE
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 22, 2022
पवार म्हणाले, अतिवृष्टीने बळीराजाचे जे नुकसान झाले आहे, त्याला तातडीने मदत झाली तरच त्याचा उपयोग होईल. 50 हजारांची मदत करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, त्या बद्दल सरकारचे आभार. मात्र मागणी करुनही जे निर्णय होत नाही, त्या बद्दल मी खेद व्यक्त करतो अशी तीव्र भावना पवार यांनी व्यक्त केली. शंभर रुपयात शिधा देण्याची योजना चांगली असली तरी त्यात लक्ष देण्याची गरज आहे. तर कोणत्या कार्डधारकांना हा शिधा मिळणे अपेक्षित आहे, याबाबत निकष अधुरे असल्याचे मी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना यांना बोलून दाखविले आहे.
शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका….
आशिष शेलार यांना राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता, यावर अजित पवार म्हणाले, राजकारण करण्यासाठी लोकसभा, विधानसभा आणि अन्य अनेक ठिकाणी आहेत. आम्ही कधीच खेळात राजकारण करत नाही विनाकारण शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका, अशी अपेक्षा यावेळी पवारांनी व्यक्त केली आहे…