नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यानावर येऊन ठेपलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आहे. यातच राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आपल्या पक्षातील उमेदवार निवडणूक येणार असल्याचा दावा करत आहे. राज्य सरकारमधील शिवसेना-भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीतील नेते पुन्हा युतीचंच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा दावा करत आहेत.
अशात आमदार बच्चू कडू यांनीही प्रहारचे 10-11 आमदार निवडणून येतील असा दावा केला आहे. सातारा येथे माध्यमांशी बोलतांना कडू म्हणाले,’आमचे 10 ते 11 आमदार निवडून येतील. आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल. आम्ही उठलो तर सरकार उठेल, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी असं म्हणत येत्या निवडकीचा अंदाज बांधला आहे.
ते पुढे म्हणाले, येत्या काळात विधानसभा निवडणुका लागतील. यात युतीमध्ये किती जागा मागणार? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून 15 जागा मागणार असल्याचं कडू यांनी साताऱ्यात सांगितलं आहे.
तत्पूर्वी, बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्र सरकारला नामर्द संबोधलं होतं. केंद्रातील सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी आणि ग्राहकांचं हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने कांद्याबाबत हा निर्णय घेतलाय, असं म्हणत कडू यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्यात शुल्क वाढवण्याच्या निर्णयावर घणाघात केला होता.