नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir election) निवडणुकीला हुलकावणी दिली आहे. असे असतानाच महाराष्ट्रातीलही स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका अद्यापही प्रलंबितच आहेत. (Election Commision)
भाजपने सत्तेत आल्यानंतर जम्मू काश्मीरमधील कलम 370 (Artical 370) हटवले. याला तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. असे असतानाच एकीकडे सरकार काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असल्याचे बोलत आहे तर दुसरीकडे त्याच काश्मीरमध्ये अद्यापही निवडणूक लावण्यात आली नाही. यावरूनही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरत निवडणुका कधी घेता, असा थेट सवाल केला होता. यावेळी सरकारने आम्ही निवडणुका घ्यायला कधीही तयार आहोत, असे जाहीर केले होते. परंतू आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने काश्मीरचा उल्लेखच केला नाही हे विशेष. (When elections be held in Jammu and Kashmir)
निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. याप्रसंगी काश्मीरच्या निवडणुकी संदर्भात विचारले असता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv kumar) म्हणाले की, जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था लक्षात घेता. तसेच राज्यातील इतर निवडणुकांसोबतच परिस्थितीनुसार येथे निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळे योग्य वेळ येताच जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांबाबत माहिती दिली जाईल, असे उत्तर त्यांनी दिले.
#WATCH | On being asked about the election in Jammu & Kashmir, Chief Election Commissioner Rajiv Kumar says, “The decision to be taken at the right time as per the security situation and other simultaneous elections in the state.” pic.twitter.com/7TkzWfKNyw
— ANI (@ANI) October 9, 2023
महाराष्ट्रातील निवडणुकाही रखडल्या
एकीकडे जम्मू काश्मीरमधील निवडणुका होत नसताना दुसरीकडे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका (Local election) लांबणीवर पडल्या आहेत. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे. या विषयी विरोधक विशेषतः ठाकरे गटाचे आमदार, खासदार आवाज उठवत असतात. मात्र, अद्याप तरी याबाबत योग्य तो निर्णय घेतल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.