Election Commissioner Arun Goyal Resign| लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत होता. त्यांनी पदाचा राजीनामा का दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यावरून विरोधी पक्षाने अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
याबाबत काल शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना गोयल यांच्या राजीनाम्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी अचानक राजीनामा काअ दिला? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावर राजीव कुमार म्हणाले की, “अरुण गोयल यांनी पद सोडण्यामागे त्यांची वैयक्तिक कारणे असतील तर पॅनेलने त्याचा आदर केला आहे. प्रत्येक व्यक्तीची एक पर्सनल स्पेस असते. त्यात ढवळाढवळ करू नये. एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारताना असंवेदनशील होऊ नये. त्यांच्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारणे असू शकतात आणि तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे.”
दरम्यान, अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची देशाचे पुढील निवडणूक आयुक्त म्हणून निवड करण्यात आली. दोन्ही नोकरशहांना निवडणूक आयुक्त बनवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील समितीने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी हेही या पॅनलमध्ये होते.
नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्त्या थांबवण्याची मागणी
दरम्यान, नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्या तात्काळ थांबण्यात येण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी या याचिकांवर असहमती व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर 21 मार्च रोजी सुनावणी करणार असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा:
राहुल गांधी यांची आज शिवाजी पार्कवर जाहीर सभा; शरद पवार, उद्धव ठाकरेंसह ‘हे’ नेतेही राहणार उपस्थित