नवी दिल्ली – देशातील आर्थिक मंदीवरून सर्वच स्तरातून सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी देशातल्या आर्थिक मंदीला मोदी सरकारला जबाबदार ठरवत ट्विटद्वारे हल्लाबोल केला आहे.
देश में अर्थव्यवस्था की हालत एकदम पतली है। सेवा क्षेत्र औंधे मुँह गिर चुका है। रोजगार घट रहे हैं। शासन करने वाला अपने में ही मस्त है, जनता हर मोर्चे पर त्रस्त है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) November 7, 2019
प्रियांका गांधी यांनी ट्विट केले आहे की,’देशातील अर्थव्यवस्थेची सद्य परिस्थिती फारच गंभीर स्वरूपाची आहे. त्याचा परिणाम देशातील सेवा क्षेत्र उद्योगावर होत आहे. तसेच व्यवसाय क्षेत्रात सुद्धा मंदीचा परिमाण दिसून येत आहे. मात्र अशा परिस्थितीत सुद्धा सरकार आपल्या मस्तीत आहे.’
त्यांनी पुढे म्हंटले की, मोदी सरकारला हा प्रश्न नक्की विचारायला हवा,’ भाजप सरकारच्या कार्यकाळात कुणाचा फायदा झाला? तसेच पंतप्रधान अमेरिकेत गेले आणि आपले ‘हाउडी मोदी’ केले, मात्र अमेरिकेत काम करण्यास इच्छुक भारतीय लोकांच्या एच -1 बी व्हिसा अर्ज नाकारण्यात आला आहे. अशा शब्दात प्रियांका गांधींनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अत्यंत प्रतिबंधात्मक धोरणांमुळे २०१५ च्या तुलनेत यावर्षी एच -१ बी अर्ज नाकारण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अमेरिकन थिंक टँकने केलेल्या अभ्यासानुसार सुप्रसिद्ध भारतीय आयटी कंपन्यांच्या एच -१ बी अर्जांना सर्वाधिक नाकारण्यात आल्याचेही समोर आले आहे.