चेन्नई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेते राहुल गांधी सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भारतीय जनता पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका करत आहेत. धारमपूर येथील एका सभेत राहूल गांधी यांनी भाजपला ‘नागपूरचे निकरवाले’ म्हणत डिवचले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही भारताचा पाया नष्ट करू देणार नाही. मोदींना हे समजत नाही की तामिळनाडूचं भविष्य केवळ तामीळ जनताच ठरवू शकते. नागपुरचे ‘निकरवाले’ तामिळनाडूचं भविष्य कधीच ठरवू शकत नाहीत असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तामिळनाडूमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र तामिळनाडूतील राजकीय वातावरण आताच तापण्यास सुरुवात झाली आहे.
#WATCH | We’ll not allow Narendra Modi to destroy the foundation of India…He doesn’t understand that only Tamil people can decide the future of Tamil Nadu. ‘Knickerwallahs’ from Nagpur can never ever decide future of the state: Congress’ Rahul Gandhi in Dharapuram, Tamil Nadu pic.twitter.com/KFDaXKeTMG
— ANI (@ANI) January 24, 2021
पंतप्रधान मोदींच्या राजकारणाने भारताचं नुकसान होत आहे. हे आपल्याला थांबवायला हवं. मोदींना भारताचा पायाच नष्ट करायचा आहे. आपण सर्वजण मोदींच्या राजकारणाविरोधात लढा देऊ, असं आवाहन राहुल गांधी यांनी तामिळनाडूमधील जनतेला केलं आहे.