चिंबळी -खेडच्या दक्षिण भागात पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने भात रोपे हिरवीगार झाली आहेत. पिकात गवताचे तण उगवले असून खुरपणीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी स्वत:च कुटुंबासह शेतात राबत आहे.
चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, सोळू परिसरातील शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी रोपे घेतली आहेत. मात्र, चक्रीवादळानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने ही रोपे पिवळी पडत होती.
त्यातच गेल्या चार -पाच दिवसांपूर्वी पडलेल्या जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे. रोपे हिरवेगार झाले असल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.