आळंदी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा-आसखेड केंद्रावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवार (दि. 19) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
तर शुक्रवारी (दि. 20) पासून रोटेशन प्रमाणे आळंदी गावठाण व हवेली विभागात उशीरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.