बेलसर,(वार्ताहर) – पुरंदर तालुक्यामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी शेती, जनावरे व पिण्यासाठी पाण्याची अत्यंत टंचाई निर्माण झाली आहे. असे असताना तालुक्यात अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या बेलसरमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीप्रश्न भेडसावत आहे.त्यामुळे सामाजिक संस्थेच्या वतीने पाणी टँकर सुरू करण्यात आला आहे.
बेलसरमध्ये खुपच कमी पाऊस पडल्याने विहिरी कुपनलिका आटल्या आहेत.बेलसरमधील प्रामुख्याने चिल्हावळी, कडा, माळ वस्ती, कदम वस्ती या वास्त्यांना पाण्याची प्रचंड दुर्भिक्ष असल्यामुळे या भागामध्ये टँकर सुरू करण्यात आला आहे; परंतु देवस्थानच्या वतीने चार दिवसांनी टँकर देण्यात येणार आहे. तरी या संदर्भात तो टँकर दोन दिवसांनी द्यावा, अशी ही विनंती ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली.
यावेळी बेलसर गावचे सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच बाळासाहेब हिंगणे, माजी उपसरपंच धीरज जगताप, ग्रामपंचायत सदस्य कैलास जगताप, सुवर्णा हिंगणे, अनिल गरुड, हेमंत जगताप, गणेश गरुड, सचिन फंड, शिवाजी जगताप, तुषार कुदळे, ग्रामसेवक अविनाश निगडे, दत्तात्रय गरूड,निलेश भोईटे इतर मान्यवर उपस्थित होते.