MP Election 2023 : मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याआधी सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही मध्य प्रदेशात जनतेला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, “जर काँग्रेसने निवडणुका जिंकल्या तर बाबर आणि औरंगजेब संपूर्ण भारतात आमच्या लोकांवर अत्याचार करू लागतील. काँग्रेसला मत देऊ नका.’असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.
‘काँग्रेसला मतदान केल्याने औरंगजेबाला व्हिटॅमिन मिळेल’
सरमा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दिग्विजय सिंह जेव्हा हिंदूंच्या विरोधात बोलतात तेव्हा रक्त उकळते. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आणि काँग्रेसला मतदान करणे म्हणजे देशातील बाबरांना प्रोत्साहन देणे, असे म्हटले. काँग्रेसला मते मिळाली की औरंगजेबांना व्हिटॅमिन मिळतात.
‘कमलनाथ निवडणूक हिंदू बनले’
ते पुढे म्हणाले की, जेव्हा-जेव्हा निवडणुका येतात तेव्हा कमलनाथ आणि काँग्रेस हिंदू होतात. यावेळी त्यांनी महादेव अॅप प्रकरणाचाही उल्लेख केला आणि भूपेश बघेल यांनी ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यांनी भूपेश अॅप आणावे महादेव अॅप नाही.
‘राहुल गांधी हमासविरोधात काहीही बोलले नाहीत’
आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “या प्रकरणी राहुल गांधी काय म्हणाले? ते हमासच्या विरोधात एक शब्दही बोलले नाहीत. ते हमासच्या विरोधात काहीही बोलले नाहीत कारण त्यांनी हमासला विरोध केला तर भारताचा हमास त्यांना सोडणार नाही.” असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.