Dainik Prabhat
Saturday, December 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मतदारांनो, एप्रिल फूल बनू नका (अग्रलेख)

by प्रभात वृत्तसेवा
April 1, 2019 | 6:00 am
A A

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचा पहिला टप्पा रंगात आला असतानाच लोकांना मजेत उल्लू बनवणारा जगातील सर्वांत मोठा दिवस, म्हणजेच एप्रिल फूल दिवस साजरा होत आहे. याला केवळ योगायोग मानता येणार नाही. आज जगाच्या पाठीवर सर्वत्रच एकमेकांना मूर्ख बनवण्यासाठी अनेक युक्‍त्या लढवल्या जातील आणि एखादा मूर्ख बनला की त्या क्षणाचा आनंद घेतला जाईल. वर्षभरातील एक दिवस असा लोकांना मूर्ख बनवण्यासाठी राखीव असला तरी मतदारांना वर्षातील 365 दिवस मूर्ख बनवण्याचा खेळ राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते सतत खेळतच असतात.

भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील मतदाराला नेहमीच राजाची उपमा दिली जाते. पण या राजालाच मूर्ख बनवण्याचे काम राज्यकर्ते करीत असतात. देशात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना आणि विविध राजकीय पक्षांकडून आश्‍वासनांची खैरात होत असताना आता मतदाराने आपण मूर्ख बनणार नाही असा निश्‍चय करायला हवा. जर राजकीय पक्ष आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातच तीच तीच आश्‍वासने पुन्हा पुन्हा प्रत्येक निवडणुकीत देत असतील तर आता राजकारण्यांना जाब विचारायची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल.सध्या सत्तेवर असलेला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप असो किंवा विरोधात असलेला कॉंग्रेस पक्ष असो कोणीही निवडणूक काळातील आश्‍वासने गांभीर्याने घेतली नाहीत आणि लोकांना वर्षांनुवर्षे एप्रिल फूल केले असाच निष्कर्ष निघतो.

स्वतंत्र भारताच्या 70 वर्षांच्या इतिहासात 60 वर्षे ज्या कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती त्या पक्षाची याबाबतची जबाबदारी जास्त आहे. 1971च्या बांगलादेश युद्धानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कॉंग्रेस पक्षाने गरिबी हटाव अशी घोषणा करून निवडणूक जिंकली होती. त्या घटनेला जवळजवळ 50 वर्षे पूर्ण होत असताना 2019च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षानेही देशातील गरिबी दूर करण्याच्या हेतूने अनेक कल्याणकारी आश्‍वासने दिली आहेत. नागरिकांच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे आश्‍वासनही कॉंग्रेसने प्रत्येक निवडणुकीत दिले होते. पण ती पूर्ण झाली का? हा संशोधनाचा विषय आहे. सत्तेवर आल्यावर गरिबांना दरमहा 6 हजार रुपये देण्याच्या राहुल गांधी यांच्या आश्‍वासनाकडे मतदारांनी गांभीर्याने का पाहायचे, हा प्रश्‍न म्हणूनच विचारावा लागत आहे. यावेळी राहुल गांधी यांनी दिलेल्या अशा कल्याणकारी आश्‍वासनांचे स्वागत करतानाच गेल्या 50 वर्षांतील 35 वर्षे सत्तेवर असलेल्या कॉंग्रेसला गरिबी हटवणे किंवा गरिबांचे कल्याण करणे का जमले नाही, हा प्रश्‍नही विचारण्याची गरज आहे.

केवळ निवडणुकीपुरतेच आश्‍वासनांचे गाजर दाखवणाऱ्या कॉंग्रेसच्या एप्रिल फूल वृत्तीला कंटाळल्यानेच देशातील मतदारांनी गेल्या निवडणुकीत मोदी यांच्या भाजपच्या पदरात सत्तेचे माप टाकले. पण गेल्या निवडणुकीपूर्वी भाजपने दिलेली आश्‍वासने किती प्रमाणात पूर्ण झाली याचा लेखाजोखाही मतदारांनी मांडायची गरज आहे. परदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचे मोदी यांचे आश्‍वासन सर्वात मोठा राजकीय विनोद ठरला आहे. मतदारांना इतक्‍या टोकाचे एप्रिल फूल कोणीही केले नसेल. देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी यांची घोषणाही अशीच चुनावी जुमला ठरू पाहात आहे. शेतमालाला हमी भाव, शेतीसाठी पाणी अशी अनेक आश्‍वासने मिळाल्याने देशातील बळीराजाने मोदी यांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले. पण चारच वर्षांत शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनेही मोदी यांची साथ सोडून दिली आहे, यातच सारे काही आले. मोदी यांच्या गेल्या 5 वर्षांच्या कार्यकाळात देशात शेतकऱ्यांचे सर्वाधिक मोर्चे निघाले हे कशाचे द्योतक आहे? महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्येही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. निवडणूकपर्व अर्थसंकल्पात मोदी यांनी काही योजनांची घोषणा करून शेतकऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यामुळे देशातील बळीराजा समाधानी होईल असे मुळीच नाही. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनांपैकी बहुतांशी आश्‍वासने अद्याप अंमलबजावणीपासून दूर असल्याने त्याचा निवडणुकीवर परिणाम होण्याच्या भीतीनेच आता देशाच्या सुरक्षेचे कार्ड ऐन निवडणूक काळात खेळले जात आहे.

भाजपचा पाच वर्षांपूर्वीचा निवडणूक जाहीरनामा आणि यावेळचा जाहीरनामा यात काहीच फरक नसेल तर गेल्या 5 वर्षांत मोदी सरकारने काही कामच केले नाही असाच निष्कर्ष काढावा लागतो. देशाला बुलेट ट्रेन किंवा स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांऐवजी सामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा देणाऱ्या साध्या योजनांची गरज आहे हे कोठेतरी समजून घेण्याची गरज आहे. कॉंग्रेसने गेल्या 70 वर्षांत काहीच केले नाही असा आरोप करून प्रचारसभा गाजवणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या कामगिरीचा गेल्या 5 वर्षांचा लेखाजोखा मांडण्याची वेळही आता आली आहे. राजकीय पक्षांच्या “कॉपी पेस्ट’ आश्‍वासनांना कंटाळलेल्या मतदारांनी आता स्वत:चा जाहीरनामा स्पष्टपणे मांडायला हवा.

आम्हाला चार घास व्यवस्थित खायला घालून मुलांना स्वस्त शिक्षण देणारे, डोक्‍यावर छप्पर देणारे आणि देशात समाजिक कल्याण प्रत्यक्षात आणणारे सरकार हवे आहे हे आता मतदारांनीच ठणकावून सांगण्याची गरज आहे. वर्षांनुवर्षे एप्रिल फूल झालेल्या आणि मूलभूत विकासापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी आता आपण राजा असल्याचा दाखला द्यायला हवा. आमचे मत तुम्हालाच असे सांगून आपल्याला पाहिजे तो निर्णय घेण्याचे एप्रिल फूल आता मतदारांनीच राजकीय पक्षांना करायला हवे. आज 1 एप्रिलच्या निमित्ताने मतदारांनी ही खूणगाठ मनाशी बांधून ठेवायलाच हवी.

Tags: editorial articleeditorial page articleसत्तेबाजी
Previous Post

लग्नाला मुलगाच मिळत नाही- सोनाक्षी सिन्हा

Next Post

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा : अंतिम सामन्यात भारत पराभूत

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : डीपफेकचा धोका
Top News

अग्रलेख : डीपफेकचा धोका

1 week ago
अग्रलेख : भाजप-अण्णाद्रमुकमधील तेढ
Top News

अग्रलेख : भाजप-अण्णाद्रमुकमधील तेढ

2 months ago
लक्षवेधी : गर्दी खेचण्याची चढाओढ
Top News

लक्षवेधी : गर्दी खेचण्याची चढाओढ

2 months ago
विशेष : आधुनिक भगीरथ
संपादकीय

विशेष : आधुनिक भगीरथ

2 months ago
Next Post
सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा : अंतिम सामन्यात भारत पराभूत

सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा : अंतिम सामन्यात भारत पराभूत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

हवाई दलाचे महासंचालकपद मराठी माणसाच्या हाती ! एअर मार्शल मकरंद रानडे यांनी स्वीकारला पदभार

IND vs AUS 5TH T20 : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरची लढत बेंगळुरूमध्ये होणार; जाणून घ्या, ‘या’ सामन्याशी संबंधित खास गोष्टी…

sahitya sammelan : साहित्य संमेलनातही मराठा आरक्षणाचे पडसाद

इस्रायलच्या नव्या हल्ल्यांमध्ये 178 ठार ! दक्षिण गाझामध्ये इस्रायलचे हल्ले वाढण्याचे संकेत

लाचखोर ED अधिकाऱ्याला पोलिसांनी पाठलाग करुन पकडले ! खटला मागे घेण्यासाठी 1 कोटींची मागितली होती लाच

IPL 2024 : न्यूझीलंडच्या ‘रचिन रवींद्र’ची ‘आयपीएल’ लिलावसाठी Base Prize झाली निश्चित…

“संपुर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी..’; बहुज समाज पक्षाची मागणी

Gujarat : गुजरातमध्ये कफ सिरप प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू तर, ७ जणांना अटक

Team India : टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘टीम इंडिया’च्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद; पाकिस्तानला टाकलं मागे…

Sharad Pawar : ‘फक्त एकच तक्रार आहे की…’; अजित पवारांच्या गौप्यस्फोटाला शरद पवारांचं प्रत्युत्तर

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: editorial articleeditorial page articleसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही