नवी दिल्ली – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू असताना, कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी रविवारी लोकांना जबाबदारीने मतदान करण्याचे आणि राज्याची प्रगती राखण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मतदान करताना लक्षात ठेवा की तुमचं एक मत राज्याच्या प्रगतीत, तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांचं कल्याण, महिला सशक्तीकरण यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
जनतेच्या हिताची धोरणे तयार करण्यास मदत करू शकते. “तुमचे मत राजकारण बदलू शकते, जबाबदारीने मतदान करा, असे ट्विट त्यांनी केले आहे.
उप्र के मेरे प्यारे बहनों-भाइयों
वोट करते समय जरूर याद रखें कि आपका एक वोट प्रदेश की तरक्की में, युवा के लिए रोजगार, किसानों की भलाई, महिला सशक्तिकरण व जनता के हित में नीतियां बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभा सकता है
आपका वोट राजनीति में बदलाव ला सकता है
जिम्मेदारी से वोट करें
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) February 27, 2022
पाचव्या टप्प्यात तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहेत ज्यांचे राजकीय भवितव्य सुमारे 2.24 कोटी मतदार ठरवतील. उत्तरप्रदेशातील उर्वरीत दोन टप्प्यांसाठी आता प्रचार सुरू आहे.