नवी दिल्ली – काही दिवसातच एअर इंडिया कंपनीचे हस्तांतरण टाटा समूहाकडे जाणार असतानाच केंद्र सरकारने इंडियाच्या अध्यक्षपदी व व्यवस्थापकीय संचालकपदी विक्रम देव यांची नियुक्ती केली आहे.
केंद्र सरकारमधील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदलाचा एक भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजले जाते. एअर इंडियाचे सरकारकडून टाटा समूहाकडे हस्तांतरण डिसेंबरअखेर होणार होते.
मात्र दरम्यानच्या काळात या संदर्भातील औपचारिक कामकाज शिल्लक राहिल्यामुळे आता हे हस्तांतरण जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.