Vijay Wadettiwar : राज्यात सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनांवरून राजकीय पातळीवर शाब्दिक युद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये (OBC) समावेश झाल्यानं फार लाभ होणार नाही. तसं झाल्यास मराठा समाजाला ओबीसीत केवळ तीन ते साडेतीन टक्के आरक्षण मिळेल, असे विधान केले आहे. तर आता त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ‘मराठ्यांना जर ईडब्ल्यूएस आरक्षणातून दहा टक्के आरक्षण मिळत असेल, तर तो खूप मोठा फायदा होत आहे. परंतु, जरांगे पाटलांना त्या फायद्यापेक्षा राजकीय फायदा करुन घेण्याची मंशा असावी. जरांगे (Manoj Jarange) मराठा तरुणांच्या फायद्यापेक्षा राजकीय लोकांच्या भल्यासाठी आग्रही आहेत, असा माझा त्यांच्यावर आरोप असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने मोठे विधान केले आहे. जरांगे पाटलांच्या सध्याच्या भूमिकेमुळे मराठा तरुणांचं भविष्यात फार मोठं नुकसान होणार आहे. मराठा तरुणांनी या संदर्भात अभ्यास करावा, जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर त्यांनी सर्व काही ठरवू नये. अभ्यास करून त्यांनी भविष्याबद्दल निर्णय घ्यावा, असा सल्ला मराठा तरुणांना देत जरांगे पाटलांच्या भूमिकेवर वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यासोबतच “मराठा तरुणांचं कशात भलं आहे आणि कशात वाईट आहे, हे त्यांनी ठरवावं. याबद्दल मराठा नेतेच ठरवतील आणि बोलतील, त्याबद्दल मी बोलणार नाही. मराठा नेत्यांनी त्यांची भूमिका ठरवावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, असेही वडेट्टीवार यांनी यायला म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला उगाच गाजर न दाखवता ठरल्याप्रमाणे वेळेत ओबीसीमधून आरक्षण द्या. शिवाय Time Bond आणि संख्याबळ वाढवून नोंदी शोधा. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न 24 डिसेंबरच्या आत अहवाल देऊन मार्गी लावा, नाहीतर हे प्रकरण जड जाईल, अशा इशारा मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी दिला आहे.