मुंबई – भाजपच्या 12 निलंबित आमदारांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आमदारांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त करत ताशेरे ओढले आहेत.
आमदारांचे निलंबन हा सर्वस्वी सभागृहाचा निर्णय आहे. मात्र जरी असे असले तरी देखील आमदारांचे साठ दिवसांपेक्षा अधिक काळासाठी निलंबन करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 18 जानेवारीला आहे. त्या दिवशी न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या मुद्द्यावरून आता भाजपा आमदार राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र सरकारनं राजकीय सूडापोटी आमच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन केलं.
नेमकं काय म्हणाले भाजप नेते राम कदम पहा व्हिडियो