वाघोली : तरुणांना राजकारणात संधी आहे. या संधीचा उपयोग समाजसेवेसाठी करावा. गावातील विविध समस्यांची माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी विकास कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी युवाशक्ती मोलाची कामगिरी करू शकेल यासाठी राजकारणाबरोबरच समाजकारणाची जोड द्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र सातव पाटील यांनी केले.
बकोरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शांताराम वारघडे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल वाघोली ग्रामस्थांच्या वतीने वारघडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र सातव पाटील यांच्या हस्ते शांताराम वारघडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सातव पाटील बोलत होते. यावेळी वाघोलीचे मानकरी नंदकिशोर दरेकर, चैतन्य दरेकर, विजय आव्हाळे, अनिकेत बगाडे, आदित्य जाधव, सोमनाथ कुटे आदी मान्यवर उपस्थित होते.