संगमनेर – राज्यात गो हत्याबंदी असतानाही संगमनेर शहरात अवैधरित्या कत्तलखाने सुरूच आहेत. त्यामुळे गोमांस पुरवठ्याचे संगमनेर हे केंद्र बनू पाहत होते.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर ‘दैनिक प्रभात’च्या प्रसारित केलेल्या शनिवारच्या वृत्तानुसार नगर पोलिसांनी कारवाई करत तब्बल एक कोटींचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत विश्व हिंदू संघटना, बजरंग दल आणि सर्वपक्षीय हिंदू संघटना आज (दि. ४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासनाला निवेदन देण्यासाठी एकवटले आहेत.
यावेळी “राज्यात गो हत्या बंद करा.., जय श्रीराम.., कत्तलखाने आजच तोडा..” अश्या प्रकारच्या घोषणा देत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडत प्रांताधिकारी कार्यालय गाठले. रोजच निष्पान गोवंश जनावरांची क्रूर हत्या होत असून जनावरांना निर्दयीपणे वागणूक मिळत आहे.
यामुळे संतप्त झालेल्या संघटनांनी एकत्र येत याचा तीव्र निषेध करत प्रांताधिकार्यांना निवेदन देत संगमनेर शहरातील कत्तलखान्यांचे समूळ उच्चाटन करण्याची मागणी यावेळी केली.