पुणे – करिअरच्या सुरुवातीची वर्षे म्हणून दहावी-बारावीकडे आजही पहिले जाते. या महत्त्वाच्या टप्प्यावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देणे आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन आवश्यक असते. केवळ याच हेतूने दै. “प्रभात’च्या कार्यालयात अशा एका कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दै. ‘प्रभात’च्या कर्मचाऱ्यांच्या दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत पाल्यांचा कौतुक सोहळा शनिवारी उत्साहात करण्यात आला.