पुसेसावळी, (प्रतिनिधी) – यावर्षी दुष्काळी परिस्थिती असताना वर्धन अॅग्रो साखर कारखान्याने उच्चांकी गाळप केले आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याअखेर 2900 रुपये, 1 डिसेंबरपासून 3,111 रुपये आणि मालकतोडीने 4,111 दर जाहीर करून ऊस बिले शेतकर्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केली आहेत.
आर्थिक व्यवहार पूर्ण केल्याने कारखान्याची विश्वासार्हता वाढली आहे. कारखान्याची नाहक बदनामी करून, विश्वासार्हतेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार्या प्रवृत्तींचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा कारखान्याचे चेअरमन व भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला.
त्रिमली (घाटमाथा), ता. खटाव येथील वर्धन अॅग्रोच्या सातव्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ संचालक भीमराव पाटील, संपतराव माने, सुनील पाटील, भीमराव डांगे, महेश जाधव, विलासराव आटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धैर्यशील कदम म्हणाले, कारखानाच्या क्षमतेनुसार उच्चांकी गाळप या हंगामात करण्यात आले आहे. साखर उतारा सरासरी चांगला आहे. पुढील हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरू करून, तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे आपले उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने ऊसतोडणी आणि वाहतूक करारांना सुरुवात झाल्याबरोबर, कंत्राटदारांनी सहकार्य करावे. आपले करार लवकरात लवकर करून घ्यावेत.
भीमराव पाटील म्हणाले, शेती विभागाच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याने अपेक्षेपेक्षा चांगले गाळप केले आहे. योग्य आर्थिक नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. शेती पाण्याची टंचाई असतानाही ऊस उत्पादकांनी वर्धन अॅग्रो कारखान्यावर विश्वास दाखवला आहे.
दरम्यान, काटा पूजन, काट्यावरील शेवटच्या वाहनाचे पूजन, वाहतूक कंत्राटदार, वाहनमालक, ऊस उत्पादक शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. सावकार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी प्रास्ताविक केले. संचालक दीपक लिमकर यांनी आभार मानले.
संचालक अविनाश साळुंखे, यशवंत चव्हाण, शरद चव्हाण, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, कराड बाजार कमिटीचे संचालक राजेंद्र चव्हाण, वडूज बाजार समितीचे संचालक महेश घार्गे, तात्या साबळे, अकबर बागवान, चीफ इंजिनिअर सतीश पिसाळ, चव्हाण, सुरक्षा अधिकारी सूर्यवंशी, इस्माईल संदे, रवी पवार, पर्चेस ऑफिसर अश्विन कदम, डी. वाय. पाटील, कर्मचारी, कंत्राटदार, सभासद शेतकरी उपस्थित होते.