नारायणगाव, (वार्ताहर) – कांदा उत्पादन वाढीसाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन कांदा व लसूण संशोधन संचानालयाचे डॉ. विजय महाजन यांनी केले.
ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित ग्लोबल कृषी जिल्हा महोत्सव 2024 च्या परिसंवाद कार्यक्रमात डॉ. महाजन बोलत होते. यावेळी प्रगतशील शेतकरी विक्रम अवचट, गामोन्नाती मंडळाचे सहकार्यवाह अरविंद मेहेर, संचालक एकनाथ शेटे, देविदास भुजबळ, गोपीनाथ दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. महाजन म्हणाले की, गादीवाफ्यावर रोपांची निर्मिती करण्याचा, उत्पादन खर्च कमी करण्याचा, संतुलित खतांचा वापर करणे, नवीन तंत्रज्ञानाचा मल्चिंगचा उपयोग करणे, बांधावरचे गवत काढून टाकल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होईल असे सांगितले. तर गोपीनाथ दिवेकर यांनी टोमॅटो लागवड, मल्चिंग पपेरचा वापर, विषानुजन्य रोगांपासून वाचण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारत टेमकर यांनी तर सुनील ढवळे यांनी आभार मानले.