Bollywood News : ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त आणि सुनील शेट्टी सध्या चर्चेत आहेत. ओटीटीवर येत असलेल्या ‘स्टार वर्सेस फूड सर्व्हायव्हल’ या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये दोघेही दिसले होते. रणवीर ब्रार होस्ट करत आहे. सुनील शेट्टी आणि संजय दत्तचे व्हिडिओही समोर आले आहे, ज्यात ते काहीतरी कूक करताना दिसत आहे. यावेळी दोघेही स्वतःबद्दल आणि बॉलिवूडच्या परिस्थितीबद्दल बोलताना दिसत आहे.
खरं तर, सुनील शेट्टीने ‘द इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम’शी संवाद साधताना शोचा अनुभव अद्भुत असल्याचे सांगितले. मित्र संजयच्या उपस्थितीने हा प्रवास कसा मनोरंजक झाला हेही त्याने सांगितले. सुनील – संजयने एकत्र शूटिंगचा आनंद लुटला.
सुनील शेट्टीला सगळे ‘अण्णा’ म्हणतात. यासंदर्भात सुनीलने खुलासाही केला आहे. हे नाव त्याला इतर कोणी दिले नसून संजय दत्तने दिले असल्याचे सांगितले. ‘आम्ही काटेचे शूटिंग करत होतो आणि माझे कर्मचारी मला मोठ्या भावाप्रमाणे अण्णा म्हणायचे. संजयही तेच बोलू लागला. मला आठवतं की 9/11 घडला तेव्हा आम्ही लॉस एंजेलिसमध्ये होतो. आम्हाला युनिटच्या जवळच राहायचे होते आणि बाहेर जायचे नव्हते. तो कठीण काळ होता. आमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले गेले आणि ते खूप विचित्र होते. पण आम्ही एकत्र राहिलो आणि एकमेकांची ताकद बनलो.’
‘मला आठवतं की आम्ही एकत्र जेवण कसं करायचो आणि आठवणी जपायचो. आम्ही एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग झालो आणि आजही एकमेकांशी जोडलेले आहोत. जो कोणी चित्रपट मासिके वाचून मोठा झाला असेल त्याला आठवत असेल की कलाकार ब्रेकच्या वेळी एकत्र कसा वेळ घालवतात. अभिनेते सेटवर खाण्यावरून नातेसंबंध निर्माण करायचे. पण आजचे कलाकार शूटिंगनंतर लगेचच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातात. या सगळ्यातून आपुलकीची भावना येत नाही, असे सुनील शेट्टी म्हणाला
‘आज इंडस्ट्रीला आवाज नाही. आमच्याकडे बोटे दाखवल्यावर कोणीही मूर्खपणाच्या विरोधात उभे राहत नाही किंवा बोलायला पुढे येत नाही. ते बंधन, ते ऐक्य हरवले आहे, तो आवाज राहिला नाही. एकमेकांचा बचाव करणारे कोणीच नसल्याने सगळेच कमजोर झाले आहे. पण मला वाटते की गोष्टी परत येत आहेत. लोक एकत्र उभे आहे. आम्ही जे काही हॅशटॅग आणि बहिष्कारातून गेलो होतो, मला वाटते की प्रत्येकाने एकमेकांसाठी उभे राहण्याची वेळ आली आहे.’