Narayan Rane: ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नारोन्हाने गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येवरून विरोधकांनी गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. त्यातच काल शिवसेना (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले असल्याचे म्हटले होते.
यावर केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे मनोरुग्ण नाही तर वेडसर आहे, काही बोलतो. बेअक्कल माणूस राष्ट्रपती राजवट केव्हा लावली जाते याचे त्याला ज्ञान आहे का? तो माझा स्पर्धक नाही. मी केंद्रीय मंत्री आहे,” अशा एकेरी भाषेत राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
सिंधुदुर्गमधील एका कार्यक्रमात राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर देखील निशाणा साध्यला. “कोणीतरी भास्कर भाडोत्री आणतात, मी काही त्याला उत्तर देणार नाही. परंतु अद्दल घडवणार आहे. भास्करने माझ्याकडून निवडणुकीत १५ लाख रुपये घेतले होते. ते पैसे अद्याप परत केले नाहीत, असा आरोपही राणे यांनी केला.
हेही वाचा:
उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका ; म्हणाले,”राज्याला मनोरुग्ण…”
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्वान गाडीखाली मेलं तर मी काय करू? असे म्हंटले होते. त्यांनी कुत्र्याला श्वान हा शब्द वापरला. संस्कृत शब्द वापरून तुम्ही सुसंस्कृत होत नाहीत. फडणवीस यांच्यासाठी मी याआधी फडतूस, कलंक असे शब्द वापरले होते. पण आता हे शब्दही तोकडे पडत आहेत. महाराष्ट्राला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली होती.
“उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम”
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले, “उद्धव ठाकरे यांची भाषा आणि त्यांचे शब्द पाहता, मला हे ठामपणे वाटते की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. मी आता एवढेच सांगेल ‘गेट वेल सून’.”
हेही वाचा:
‘शिंदे सरकार बरखास्त करून राज्यात त्वरीत निवडणूका घ्या…’; उद्धव ठाकरे यांची मागणी