मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार झेपत नाही त्यामुळे मध्यावधी निवडणूक होईल हे निश्चित आहे असं वक्तव्य नारायण राणेंनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच पदावर रहायचं नाही. शिवसेनेत असंतोष आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
सत्तेसाठी जी लाचारी पत्करली आहे ते शिवसैनिकांना आवडलं नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांचा कोकण दौरा केला. मात्र या दौऱ्यात त्यांनी कोकणाला काहीही दिले नाही. त्यांचा सगळा दौरा हेलिकॉप्टरने होता. रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पाविषयी त्यांनी एकही शब्द काढला नाही अशीही टीका राणेंनी केली.