सातारा – भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपवर टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल करण्यात आलेल्या विधानाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. या प्रकरणात आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली असून भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
विद्युत जनित्र ठेवावे. तालुकास्तरीय आधिकाऱ्यांनी गावागावांत जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे, जास्तीत जास्त नागरिक या उत्सवात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे त्वरीत करावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपरीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. सर्व विभागप्रमुखांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
संतापलेल्या उदयनराजे भोसले यांनी भगतसिंह कोश्यारींची अक्कलच काढली. तर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींना भिकारडा म्हणत सुनावलं आहे. गॅंगरीन झाल्यावर जसा शरीराचा भाग कापून टाकतात, तसंच या लोकांना पक्षाने कापून फेकून द्यावं, अशी भूमिका मांडत उदयनराजेंनी पंतप्रधान मोदींकडे ही मागणी केली आहे. उदयनराजे भोसले म्हणाले, “”कोण काय म्हणतंय यापेक्षा प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, वाटचालीला सुरू करत नाही. आज महाराष्ट्रात काय सुरू आहे, राज्यपाल पद सन्मानाचं पद आहे. सन्मानाच्या पदावर विराजमान असतात, निदान त्या माणसाला अक्कल पाहिजे, कळायला पाहिजे. एक दोनदा त्यांनी हे केलंय.” अशा शब्दांत टीका उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.
दोघांना माफी मागायला लावा
तो सुधांशू त्रिवेदी… कुठला तो भिकारडा. टुकार. अशा लोकांनी काही पण शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळकळीची विनंती आहे की, आपल्या माध्यमातून देशात विकासकामांची वाटचाल होत असताना या अशा दोन लोकांमुळे गालबोट लागत असेल तर या दोघांना माफी मागायला लावा. प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीला पक्षातून काढून टाका. या राज्यपालाला खाली ओढून त्याला लांब कुठेतरी फेकून द्या, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.