पुणे – ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यातील कार्तिकी भागवत एकादशी यात्रेनिमित्त खालापूर येथून आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडी कान्हे फाटा येथून पुढे जात असतांना खालापूर येथून आळंदीकडे जात होती त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातात ऐकून दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 20 वारकरी जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात आज सकाळी ७ च्या सुमारास कान्हेफाटा येथे घडला.
या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांना मिळताच घटना स्थळातून पिकअप चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर जखमीं वारकऱ्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीडशे वारकरी हे खालापूर उंबरी गाव येथून आळंदीच्या दिशेने कार्तिकी यात्रेनिमित्त निघाले होते. पायी चालत असतांना जवळवून जाणाऱ्या पिकअप चालकाचा वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि वारकऱ्यांच्या रांगेत गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे.दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 20 वारकरी जखमी झाल्याची माहिती तपास अधिकारी वडगाव मावळचे पोलीस उपनिरीक्षक चामे यांनी दिली आहे.