पिंपरी (प्रतिनिधी) – धावत्या रेल्वेखाली सापडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा व पुरुषाचा समावेश आहे. ही घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी पहाटे घडली. गौतमी महेंद्र जाधव (वय २९, रा. चिखलीगाव) आणि रवी चंदर पिवाल (वय ३५, रा. विकासनगर, देहूरोड) अशी अपघातात मयतांची नावे आहेत.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पहाटे पावणेसहा वाजताच्या सुमारास रेल्वेखाली सापडून या दोघांचा मृत्यू झाला. मयत रवी यांची पत्नी यापूर्वीच वारलेली आहे. तर गौतमी यांचे पतीही वारलेले आहेत. ते दोघे एकमेकांना ओळखत होते. रेल्वे पोलीस याबाबत तपास करीत आहेत.