आळंदी – राहत्या घरातून अल्पवयीन मुले बेपत्ता झाली आहेत. निखिल वर्मा (वय 8 वर्ष), नितीन वर्मा (वय 6 वर्ष) अशी या बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (दि. 6) विठ्ठलवाडी, देहूगाव येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मी राजकुमार वर्मा (वय 30 वर्ष) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विठ्ठलवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. ते मजुरीचे काम करत असून नेहमीप्रमाणे मुलांना घरी ठेवून सकाळी 9 वाजता कामावर गेले होते. सायंकाळी 6 वाजता कामावरून घरी आल्यानंतर दोन्ही मुले घरात नव्हती. त्यांनी घराच्या परिसरात, शेजारी, नातेवाईकांकडे विचारपूस केली मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.
दरम्यान, निखिल वर्मा (वय ८ वर्ष) उंची 4.5 फूट, बांधा पातळ, रंग गोरा, केस बारीक काळे, अंगात नेसणीस पिवळ्या रंगाचे चौकडी शर्ट त्यावर जॉय नेस्ट शाळेचा बॅच, निळ्या रंगाची फुलं पँट पायात लाल रंगाची चप्पल.. आणि नितीन वर्मा (वय ६ वर्ष) उंची 4 फूट, बांधा पातळ, रंग गोरा, केस बारीक, अंगात नेसणीस सफेद रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची हाफ पँट, पायात निळ्या रंगाची चप्पल अशी वर्णन असलेली मुले दिसून आल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन देहूरोड पोलिसांनी केले आहे. 02027671188, 9823586190, 9422939077.