नोएडा – देशातील सर्वात उंच इमारत म्हणजेच ट्विन टॉवर अखेर जमीनदोस्त करण्यात आली आहे. नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर अखेर पाडण्यात आले आहे. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असणारा ट्विट टॉवर आज शेवटी पाडण्यात आला आहे. काही सेकंदामध्ये हे बहुमजली टॉवर्स कोसळली. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते. यातच आज सुपरटेक एमराल्ड कोर्टच्या रहिवाशांना एका माणसाची खूप आठवण येत आहे.
खरं तर, सुपरटेक एमराल्ड कोर्टच्या रहिवाशांनी यासाठी एक दशकाहून अधिक काळ लढा दिला आहे. आता तो दिवस जवळ आला आहे, लोकांना व्हीसी श्रीवास्तव या खास व्यक्तीची आठवण येत आहे. ज्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला.
कोण आहेत व्हीसी श्रीवास्तव?
व्हीसी श्रीवास्तव हे सुपरटेक एमराल्ड कोर्टचे सचिव होते. ज्यांनी ही बेकायदा इमारत पाडण्यासाठी प्रदीर्घ लढा दिला. सोसायटीतील रहिवासी इंदू गुप्ता सांगतात की, ‘व्हीसी श्रीवास्तव आमच्या सोसायटीसाठी लढत राहिले. आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो.’
जाणून घ्या श्रीवास्तव यांचे स्वप्न काय होते?
व्हीसी श्रीवास्तव यांच्या पत्नी अन्नपूर्णा श्रीवास्तव सांगतात की, ‘वयाच्या ७५ व्या वर्षीही ते समाजासाठी नेहमीच सक्रिय होते. भ्रष्टाचाराने बनलेली ही इमारत कोसळून पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते, मात्र त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. व्हीसी श्रीवास्तव यांची मुलगी प्रीती चंद्रा सांगते की, ‘शेवटच्या क्षणी जेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती आरडब्ल्यूएच्या कार्यालयातच भेटत होती. ही इमारत सुरक्षितपणे पाडता यावी यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत होते.’