मुंबई – टीव्ही ऍक्टर पार्थ समर्थान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्याने आपल्या पदार्पणाच्या सिनेमाबाबत अधिक तपशील दिलेला नाही. मात्र त्याचे हे पदार्पण आलिया भटबरोबर असेल एवढे समजले आहे. हा सिनेमा सध्या प्री-प्रोडक्शन स्थितीमध्ये आहे.
सिनेमाचे सगळे नियोजन योग्य प्रकारे झाले तर प्रेक्षक मला आल्याबरोबर बघू शकतील, असे पार्थ म्हणाला. संजय लीला भन्साळी यांच्या “गंगुबाई काठीयावाडी’ मध्ये पार्थ आलिया बरोबर काम करेल अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्याने रसुल पुकुट्टी यांच्या “बिहारवा’ देखील स्वीकारला असल्याचेही समजले आहे. याही सिनेमांमध्ये आलिया भट असणार आहे. भारत चीन युद्धात शहीद झालेल्या बाबा हरभजन सिंग यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे.
मात्र अद्याप त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. “कैसी है यारीया’ आणि “कसोटी जिंदगी की 2′ या सिरीयलमध्ये पार्थच्या भूमिकेला मोठा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.