नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील सत्तारूढ तृणमुल कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तृणमूल कॉंग्रेसने त्या राज्यात खुनी खेल खेला आहे असा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमधील क्षेत्रीय पंचायती राज परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी हा आरोप केला.
पंतप्रधानांनी तृणमुल कॉंग्रेसवर मतदारांना धमकावण्याचा आणि त्यांचे जीवन नरक बनवल्याचा आरोप केला. भाजपचा कोणताही उमेदवार उमेदवारी अर्ज भरू नये यासाठी ते काहीही करतात. ते केवळ भाजप कार्यकर्त्यांनाच नव्हे तर मतदारांनाही धमकावतात. बूथ काबीज करण्यासाठी कंत्राटे दिली जातात.
त्यांच्या राज्यात राजकारण करण्याचा त्यांचा हा प्रकार आहे, टीएमसीने गुंडांना कंत्राट दिले आणि त्यांना मतमोजणीच्या दिवशी बूथ ताब्यात घेण्यास सांगितले. हे सर्व असूनही भाजप जिथे जिंकला तेव्हा त्यांनी आमच्या सदस्यांविरुद्ध मोर्चे काढले.
पश्चिम बंगालमध्ये जुलै रोजी पंचायत निवडणुका झाल्या त्यात तृणमुल कॉंग्रेसला घवघवीत यश मिळाले असले तरी त्या राज्यात निवडणूक काळात मोठा हिंसाचार झाला होता त्या अनुषंगाने मोदींनी ही टीका केली.