माळेगावातील आजीबाईंनी एकरी मिळवेले 7 लाख : तरुणाला लाजवेल असा करिष्मा
माळेगाव- अवकाळी पावसाने कडधान्यासह फळबागाच्या झालेल्या नुकसानीने शेतकरी हैराण झाला आहे. त्यातही कच न खाता तो काळ्या आईची सेवा करण्यात मग्न आहे. तसेच म्हणतातान ना शेतकऱ्याला कष्टाची तमा, जात, वय नसते. याचे उत्तम उदाहरण ठरले आहे ते म्हणजे माळेगावातील 75 वर्षीया अजीबाई. ज्या सहा एकरामध्ये आजीबाईं गेले 20 ते 25 वर्षे पारंपरिक शेती करीत होत्या. त्याला आता शतावरी ही उजवी ठरली आहे. अवघ्या 18 महिन्यांत जवळपास सहा ते सात लाख रुपये उत्पन्न आजींनी मिळवत तरुण शेतकऱ्यालाही लाजवे असा करिष्मा करून दाखवला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगावात असणाऱ्या नाळेवस्ती येथील 75 वर्षांच्या सखुबाई गायकवाड या आजींनी पारंपरिक शेती करीत असताना एका औषध कंपनीने पीका बद्दल दिलेल्या माहिती दिली. त्यावरून आजी गायकवाड यांनी पांरपरिक शेती करीत असतानाच आपल्या 6 एकर उसातील 1 एकर ऊस मोडून आयुर्वेदात विशेष असे महत्व असणाऱ्या शतावरी या पिकाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि या पीक लागवडीपासून काढणीपर्यंत दीड लाख रुपये खर्च करून तब्बल सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
बारामती तालुक्यात तस पाहिले गेले तर शतावरी हा विषय या भागांमध्ये नवीनच होता. मागील 20 ते 25 वर्षांपासून उसासह सोयाबीन, मका अशीच पीके घेत होतो. आधुनिक शेतीविषयी मला काहीही माहिती नव्हते. एका शेती उपयोगी औषध कंपनीकडून माहिती मिळाली आणि शेतात मी नवा प्रयोग करण्याचे ठरविले. अन् मी आपल्या सहा एकरामधील एक एकर क्षेत्रात शतावरीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयानंतर काहीकाळ आजींच्या मनात धाकधूक होऊ लागली. आपला हा निर्णय चुकीचा तर ठरणार नाही ना… परंतु आजीबाईंनी आजीबात खचून न जाता, एक एकरातील पीकासाठी लावली. अन् मग काय, पुढील अवघ्या 18 महिन्यांतच आजींचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्या “लखपती’ झाल्या आहेत.