कंपनीच्या वरिष्ठांकडून स्पष्टीकरण
नवी दिल्ली – टोयोटो किर्लोस्कर मोटार कंपनी भारतात गुंतवणूक चालूच ठेवणार आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि तंत्रज्ञान विकासासाठी 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझु योशिमुरा यांनी सांगितले.
भारतात वाहनावर जास्त कर आहेत. त्यामुळे ही कंपनी विस्तारीकरणाचे काम थांबणार आहे. असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल सांगितले होते. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हे स्पष्टीकरण केले आहे. कंपनीचे उपाध्यक्ष शेखर विश्वनाथन यांनी गुंतवणूक थांबविणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर लगेच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विक्रम किर्लोस्कर यांनी कंपनी आगामी काळात 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रकाश जावडेकर यांनी किर्लोस्कर यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन टोयोटो कंपनी भारतात गुंतवणूक चालूच ठेवणार असल्याचे सांगितले. कंपनीने असे म्हटले आहे की, कंपनीची उत्पादन क्षमता 3 लाख 10 हजार प्रति वर्ष इतकी आहे. विस्तारीकरणाची गरज नसली नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गुंतवणूक होणार आहे.