वाघोली (प्रतिनिधी) – राज्यातील दगडखाण कामगारांच्या प्रलंबित मागण्यावर वाघोली येथे कामगार दिनाननिमित्त संतुलन संस्था आयोजित जन सुनावणी संपन्न झाली. सुनावणीचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी बोलतांना ते म्हणाले ‘कामगारच जगाला पोसतो मात्र मुठभर लोकांची मक्तेदारी झालेली आहे. देश सर्वांचाच आहे तथापि मुठभर प्रस्थापित आमच्यातील फुटीरपणाचा फायदा उठवत आमच्यावर अन्याय करत आहेत’ असे मत मांडले.
जन सुनावणीच्या सुरुवातीला दगडखाण कामगार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. बी. एम. रेगे व संतुलन संस्थेच्या संचालिका पल्लवी रेगे यांनी प्रमुख मागण्या जनसुनावणीत मांडल्या.यावेळी माजी केंद्रीय श्रम आयुक्त सी. पीय ऑडीचा यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व सत्कार केला. दगडखाण कामगारांचे मुखपृष्ठ ‘ठिणगी’ या वार्षिक पुस्तकाचे प्रकाशन न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमासाठी माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील , माजी उपसरपंच मंदाकिनी जाधवराव, तृप्ती शिंदे, भिम आर्मीचे नागेश पवार व पुणे सातारा, कोल्हापूर जिल्हातून मोठ्या संख्येने दगडखाण कामगार उपस्थित होते. संतुलन संस्थेच्या संचालिका पल्लवी रेगे यांनी आभार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन अनिल राजगुरू, पांडुरंग भालेराव, सुनील मासिह, बालाजी ढोणे, सावन पॉल, स्नेहप्रभा वैराळ, प्रिया चांदणे, पार्वती विभूते, सीमा साळवे, शेख नूरमहमद व आशा भालेराव यांनी केले.