शिर्डी – 2019 साली कॉंग्रेस वाचवि ण्यासाठी मी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावणार असे सांगणारे आणि एकाकी खिंड लढवणार म्हणवून मिरवून घेणारे आता हतबल का झाले? खिंड लढवायची सोडून त्यांनी पळ काढण्यात समाधान मानले आहे, अशी घणाघाती टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करून थोरातांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
ते म्हणाले की,नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीनंतर कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविण्याची भाषा करतात, त्यांचे प्रदेशाध्यक्षांशी जमत नाही म्हणून सांगतात. या बऱ्याच गोष्टींचे आश्चर्य वाटते. पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार होता आणि कॉंग्रेस पक्ष हा आघाडीचा घटक पक्ष आहे. पण कॉंग्रेसने आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी का प्रयत्न केला नाही. हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. कॉंग्रेसमध्ये देखील तुम्हाला कुणी विचारत नाही. तुम्ही देशातील अध्यक्षांकडे जावून भांडा किंवा महाराष्ट्राचे जे प्रभारी असतील, त्यांच्याकडे जावून भांडा, परंतु पक्षाचा अंतर्गत वादाचा परिणाम महाविकास आघाडीवर झालेला आहे, त्याची जबाबदारी ते घेणार की नाही. हा महत्वाचा प्रश्न आहे,असा प्रश्न विखे पाटील यांनी केला आहे.